Sunday, June 19, 2016

अंकोदुहि भाग् ०८



पुर्वी एका रात्री मी आईच्या मांडीवर डोकं ठेवुन झोपण्याचा प्रयत्न करत होते, तेंव्हा आईनं विचारलं, ' बाळा, काहीतरी विचारायचं आहे तुला, आणि त्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय मला सुद्धा शांतता मिळणार नाही, विचार काय हवंय तुला ?'
मी आईला आज पुन्हा तोच प्रश्न् केला, ‘’ आई, स्वयंवर् म्हणजे आपल्याला जो आवडेल्, हवासा वाटेल् असा वर् निवडण्याच्ं स्वात्ंत्र्य् देणारी व्यवस्था ना, मग् ताईच्या स्वय्ंवरात् तो धनुष्याचा पण् कशासाठी ठेवला गेला ?, त्या धनुष्याच्ं अन् ताईच्ं काही नात्ं आहे. आणि तु मागे एकदा क्षत्रिय असा उल्लेख् केला होतास्, त्याचा इथ्ं काही स्ंब्ंध् आहे अशी श्ंका आहे मला, या सगळ्याचा उलगडा झाल्याशिवाय् मला देखिल् शांतता लाभणार् नाही.’’
आईच्या चेह-यावरचे शांत भाव् बदलत चालल्याच्ं मला जाणवल्ं, अगदी तिच्याकड्ं न पाहता देखील्, माझ्या डोक्यावर् फिरणारा तिचा हात् आता एकाच् ठिकाणी स्तब्ध् झाला होता. ‘’ हे पहा बाळा, तु म्हणतेस् ते अगदी योग्य् आहे, एखाद्या स्त्रिला तिला योग्य वाटेल् अशा पुरुषाशी विवाह् करण्याची मोकळीक् असण्ं म्हणजे स्वयंवर्, पर्ंतु हे तुम्हां तिघींच्या, क्षत्रियकन्यांच्या बाबतीत् खर्ं आहे, कारण् तुमचा जन्मच् झालेला असतो, स्वत्ंत्र विचाराच्या आणि निर्णयक्षमता असलेल्या स्त्रि पुरुषाच्या संकरातुन्, तुमच्या आईन्ं देखील् स्वयंवराचा अधिकार् वापरुन् आपल्या पतिची निवड् केलेली असते, पर्ंतु तुझ्या ताईच्ं तस्ं नाही, ती भुमिकन्या, जमिनिच्या पोटात् एका पेटित सापडलेली, तिच्या ख-या मातापित्यांविषयी कुणालाच सत्य् माहित् नाही.
मग या भुमिलाच तिची आई मानल्ं जाउ लागल्ं, क्षत्रिय् हे या भुमिवर् राज्य करणारे आणि भुमि हे राज्य् करुन् घेणारी हा नियम् आहे या जगाचा. या भुमिच्ं रक्षण् करण्ं हे आपणा क्षत्रियांच्ं कर्तव्य, या बदल्यात् हि भुमी त्यांना धान्य्, धातु अशी स्ंपत्ति देत् राहते.. तिला आपला रक्षक् निवडण्याच्ं स्वात्ंत्र्य् नाही, अनेक् वेळा युद्धातुन् किंवा तहांमधुन् तिचा रक्षक् , तिचा अधिकारी बदलतो,
म्हणुन् तुझ्या ताईसाठी हा स्वयंवरात् हा पण् ठेवला गेला, निदान् या धनुष्याच्या निमित्तान्ं तरी या भुमिकन्येचा विवाह् योग्य अशा क्षत्रियाबरोबर् व्हावा जो तिच्ं रक्षण् करु शकेल्, तिला जपु शकेल् आणि तिच्यापासुन् प्राप्त् होणा-या स्ंपत्तीचा अधिकारी होउ शकेल्.
या उत्तरान्ं ना माझ्ं समाधान् झालं, ना आईच्ं पण् आता अजुन् झोप् टाळण्ं शक्य् नव्हत्ं, म्हणुन् आम्ही दोघीही झोपी गेलो.
या दिवसान्ंतर् आमच्या नगरांत् फिरण्यावर् ब्ंधन्ं आली, कुठेही जायच्ं असेल् तर् बाबांना किंवा काकांना विचारुनच् जाव्ं लागे आणि प्रत्येकवेळी महिष् दलाच्या आवरणातच् वावराव्ं लागे, नाट्यशाळा असो की गोशाळा, एखादाच् दिवस् उद्यानात् आणि नदी किनारी जायची परवानगी मिळे.
‘ उद्या राजा दशरथ् आणि त्यांचे म्ंत्रिगण् वाड्यात् येणार् आहेत्’ बाबांनी आमच्या दालनात् येत् घोषणाच् केली, आम्ही तिघी उठुन त्यांना नमस्कार् केला, उद्या तिस-या प्रहरी राजा दशरथ् आणि त्यांचे सहकारी म्ंत्रि तसेच् कुलगुरु येणार् असल्याच्ं कळाल्ं, बाबा, काका आणि इतर् मोठ्यांना तर काही वेळ् नव्हता, त्यांच्या सोबत् सगळी मिथिला नगरी एक् लग्ननगरी झाली होती.. सगळे जण् विवाह समारंभाच्या तयारीत् लागले होते, पण् अजुन् विवाह् कधी आहे हेच् ठरलेल्ं नव्हत्ं, उद्याच्या भेटीच्या वेळी या सर्व् गोष्टी ठरतील् अस्ं आईन्ं सांगितल्ं.
ती रात्र मी आणि ताईन्ं वाड्यातल्या पुष्करिणिच्या काठावर् बसुन् बोलत् जागवली.. ‘’ ताई, तुला पुन्हा भेटावं अस्ं वाटलं का गं रामाला, ? मी विचारल्ं ‘ नाही ग, त्या दिवशी आपण् नाट्यशाळेत् जात् होतो तेंव्हा त्यांच्या निवासाजवळुन् रथ् जाताना दिसले होते, थांबाव्ं अस्ं वाट्लं देखील्, पण् बाबांची आज्ञा आठवली अन् काही बोलले नाही.’’
‘हो, पण् तेंव्हा तर् ते दिसले होते ना, च्ंपकव्रुक्षाखाली बसलेले त्या ऋषींसोबत्, एका हातात् खड्ग् होत्ं अन् दुस-या हातात् बाण्, तुझा विचार् होता तर थांबलो असतो, मी तर बाबांची अनुमती घेतली असती अशा वेळी..
अजाणतेपणी मी तिला तिच्ं वेगळ्ंपण् जाणवुन् देण्याचा प्रयत्न् केला, अन् ती एकदम् शांत झाली, समोरच्या पाण्यात् पाहात्. मग मीच् माझ्या डोक्यातुन् एक् फुल् काढुन् पाण्यात् टाकल्ं अन् पाणि हलल्ं तस्ं तिच्ं एकटक् पाहण्ं भंगल्ं, ‘’ खर्ं सांगु, आता या पाण्यात् पण् मला रामाच्ंच् चित्र दिसत्ंय्,’’ तिच्या चेह-यावर् पुन्हा तेच आश्चर्य् आणि मोहाचे तर्ंग् उमटत होते.

अंकोदुहि भाग् ०७

त्याचवेळी, काही ऋषीचं तिथं आगमन झालं, आणि त्यांच्या बरोबर दोन युवक होते, ते होते ऋषीवेशातच मात्र त्यांच्या हातात शस्त्रं होती, त्यांच्या पायातल्या लाकडी खडावांच्या खडखडाटानं सभास्थान भरुन गेलं, जेंव्हा ते सर्वजण मध्यभागी थांबले तेंव्हा अपयशानं दुखी दिसणारा रावण आपले अलंकार,वस्त्रं अन खड्ग सावरीत निघाला होता, आतादेखील तो तेवढाच तो-यात चालत होता जेवढा आत येताना होता. तो बाहेर गेल्यावर तिथली कुजबुज कमी झाली, ' हे जनकाधिपती प्रजावत्सल जनका, माझ्या बरोबर अयोध्यानरेश दशरथाचे पुत्र राम व लक्ष्मण आलेले आहेत, आणि ते देखिल इथं उपस्थित असलेल्या राजांच्या एवढेच या स्वयंवरात भाग घेण्यासाठी योग्य आहेत परंतु काही काळापासुन ते आम्हां बरोबर असल्याने ते इथं उपस्थित असलेल्या इतरांसारखे राजवस्त्रांलंकारांनी सज्ज होउन येउ शकले नाहीत, आणि अशी माझी खात्री आहे की ह्या स्वयंवरात सर्व लायक क्षत्रियांना भाग घेता येईल, या साठी त्यांना तुझी अनुमती असावी असं मला वाटतं ' त्या ऋषींचं हे बोलणं संपलं त्याच वेळी शस्त्रधारी ते दोन युवक पुढं आले, खांद्यावरची तपकिरी रंगाची भिल्ल प्रकारची धनुष्यं सावरत त्यांनी काका आणि बाबांकडे पाहात नमस्कार केला.
बाबा, घाईघाईनं आसनावरुन उठुन खाली गेले, त्यांनी त्या ऋषींच्या पायावर मस्तक ठेवुन नमस्कार केला अन अतिशय आदरानं त्यांना आसनावर बसवलं, बाजुच्याच आसनांवर राम आणि लक्ष्मण देखील बसले. दोन्ही राजकुमारांनी सगळ्या सभेचं लक्ष वेधुन घेतलं, ऋषींनी ओळख करुन दिली नसती तरी ते दोघं एखादया मोठ्या वंशाचे आहेत हे त्यांच्या चेह-यावर आणि हालचालीतुन समजत होतंच. बाबा, पुन्हा व्यासपीठावर आल्यावर त्यांचं, काकांचं अन कुलगुरुंच काही बोलणं झालं, अगदी हलक्या आवाजात. काही क्षणांनंतर काकांनी आसनावरुनच हात वर करुन आज्ञा दिली, त्याच वेळी सगळ्या मंडपातुन पसरुन राहिलेलं आमचं सैन्यदल बाहेरच्या बाजुला निघुन गेलं, माझा हात नकळत कंबरपट्ट्यामधल्या शस्त्रावर स्थिर झाला, आता अगदी एकदाच लक्ष देउन पाहिलं तरी मोजता येतील आणि लक्षात राहतील एवढेच लोक मंडपात उरलेले होते. काकांनी ऋषींच्या दिशेनं बघुन हातानंच अनुज्ञा दिली, राम आसनावरुन उठले, खांद्यावरुन धनुष्य आणि त्याखालचं भिल्ल वस्त्र काढुन ठेवलं, सभेच्या मध्यभागी येउन व्यासपीठाकडं पाहात काकांना नमस्कार केला, वळुन धनुष्याकडं गेले त्याला नमस्कार केला, आणि जणु काही बराच काळ ते धनुष्य हाताळत असल्याप्रमाणं, ते उचललं, एका बाजुला प्रत्यंचा लावली, ते टोक डाव्या पायात पकडलं, प्रत्यंचेचं दुसरं टोक उजव्या हातात होतं, डाव्या हातानं धनुष्य पकडलेलं होतं. आमच्याकडं त्यांची पाठ होती, दोन क्षण थांबुन उजवा हात पाठीमागुन फिरवत धनुष्याच्या टोकापर्यंत नेला, आणि प्रत्यंचा धनुष्याला बांधली. पण पुर्ण झाला, आणि व्यासपीठाकडं वळत उत्सुकतेनं प्रत्यंचेला ताण दिला, ताणलेली प्रत्यंचा सोडताच झालेला नाद सगळ्यांनीच आश्चर्यचकित करुन गेला.
झाल्ं, स्वय्ंवराची अट् पुर्ण् झाली, रामान्ं ते धनूष्य् खाली ठेवल्ं आणि पुन्हा मागं वळुन् काकांना नमस्कार् केला आणि जाउन् आसनावर् बसुन् राहिला, ताईची अवस्था मात्र पाहावत् नव्हती. तिच्या चेह-यावर् आश्चर्य् आणि मोह् एकत्रच् दिसत् होते, जणु काही ती याच् क्षणाची वाट् पाहात् होती, पण् त्याचवेळी तो येउ नये असंही तिला वाटत् होत्ं.
बाबांनी पुढ्ं होउन् स्वय्ंवराचा सोहळा स्ंपल्याची घोषणा केली, तसेच् सर्व उपस्थित् राजांचे आणि इतर जनांचे आभार् मानले, पाहता पाहता त्या ऋषीगण् आणि राम् लक्ष्मणाच्या बाजुला आमच्या सैनिकांची एक् तुकडी अर्धवर्तुळाकार् परिघात् उभी राहिली, बाबा खाली उतरुन् त्यांच्याकडे जाउन् त्यांच्याबरोबर् बोलत् होते, काकांनी आम्हां सर्वांना तिथुन् वाड्यात् जायला सांगितल्ं. आम्ही चौघीजणी शांतपणे आत् आलो, एव्हाना तिथ्ं जे काही झाल्ं ते आई आणि काकुना कळाल्ं होत्ंच्.. त्यांच्याही चेह-यावर् आन्ंद् होता. ताईला समोर् बघताच् काकुन्ं जवळ् घेतल्ं, दोघींच्या डोळ्यातुन् अश्रु वाहात् होते.
त्याच दिवशी एक राजदुत अयोध्येला पाठवण्यात आला, राम, लक्ष्मण आणि ऋषींची राहण्याची व्यवस्था वाड्याच्या जवळच असलेल्या एका उद्यानात केली होती. सगळे नगरवासी आता, स्वयंवराची तयारी आवरुन विवाहाच्या तयारीला लागले होते, तीन चार दिवसांनी राजा दशरथ आपल्या कुटुंबियांसहित मिथिलेला येत असल्याची वार्ता आमच्या गुप्तचरांतर्फे आम्हाला मिळाली.

अंकोदुहि भाग् ०६

आणि, उजव्या रांगेच्या पहिल्या राजाच्या मंत्र्यानं उभं राहुन त्या राजाची ओळख करुन द्यायला सुरुवात केली. ते झाल्यावर काकांनी ताईला विचारलं, ' योग्य ?' तिनं उत्तर दिलं ' योग्य' . काकांनी हात उंचावुन तिची मान्यता सभेला कळवली, आणि निसंदन क्षेत्राचा तो राजा धनुष्यावर प्रत्यंचा चढवण्याकरिता उभा राहिला.
त्यानं ते धनुष्य उचललं, अगदी सहज पेललं आणि प्रत्यंचा उचलण्यासाठी तो खाली वाकला, पण त्यावेळी त्याचा तोल गेला अन तो खाली पडला, मला तर हसुच आलं, आणि मग लक्ष गेलं या गडबडीत देखिल ते धनुष्य खाली जमिनिवर पडलं नव्हतं तर त्या चौरंगावर एका टोकाला आलं होतं. तो राजा चिडुन निघुन गेला, अगदी सभा सोडुनच गेला. मग दुसरा राजा, मग तिसरा असं सुरु झालं. काहींना तर ते धनुष्य पेलता देखिल आलं नाही, तर बरेच जण त्या प्रत्यंचेच्या गोंधळात फसत होते, काही जणांना तिच्यामुळं मला झाली होती तशी जखम देखिल झाली होती. दोन प्रहर झाले, कुलगुरुंच्या संमतीनं एक प्रहराची विश्रांती घेण्याचं ठरलं. त्यानुसार स्वयंवराचा कार्यक्रम एक प्रहरासाठी स्थगित केल्याची घोषणा केली गेली. ज्या राजांना संधी मिळाली होती पण यश मिळालं नव्हतं, त्यापैकी बरेचसे सभास्थानाच्या बाहेर काही अंतरावर एकत्रित झाले असल्याचा निरोप दुताकडुन आल्यावर, बाबा आणि व्यासपिठाजवळ उभ्या असलेल्या सैनिकांचा एक गट त्या दिशेला गेला. जाताना ज्या पदधतीनं बाबांनी आपली तलवार सिद्ध केली होती ते पाहुन मला सकाळ्चे आईचे शब्द आठवले.
काही वेळानं बाबा आणि ते सैन्यदल परत आलं तेंव्हा कळालं की, फक्त बोलणी होउन होउ घातलेला तणाव टाळला गेला होता. तरी देखील बाबांची नजर बदललेली दिसत होतीच. आल्यावर त्यांनी लगेच काकांच्या कानात काही गोष्टी सांगितल्या, आता समोर फार कमी राजे होते, आणि ते सुद्धा वेगवेगळ्या जागी विखुरलेले होते. स्वयंवर पुन्हा सुरु होण्यास अजुन काही वेळ होता, आम्ही सा-या जणी एका बाजुला पडद्यांच्या आडोशात जलपान करुन परत येईतो पाहिलं तर समोरच्या सगळ्या मोकळ्या जाग्या नगरातल्या नागरिकांनी भरुन गेलेल्या होत्या, पुन्हा एकदा नजर फिरवल्यावर समजलं की समोर उभ्या असलेल्या नागरिकांच्या मागे आमचं सैन्यदल विखुरलेलं होतं. पुन्हा एकदा मनात भीती, उत्सुकता दाटली आणि आईच्या शब्दांनी पुन्हा एकदा धीर दिला. ताईचा हात हातात धरला, किंचीत ओलावा जाणवत होता तिच्या हाताला आणि कंप देखील. माझा दुसरा हात धाकट्या मांडवीच्या हातात होता, ती मात्र स्थिर होती, का असावं असं, तिच्या चेह-याकडं पाहुन देखील तिच्या नजरेतली शांतता मला सुखावुन गेली.
स्वयंवर पुन्हा सुरु झाल्यावर, पुन्हा आणखी काही राजांच्या अयशस्वी प्रयत्नांनंतर एका उंच आणि बलदंड पुरुषानं सभास्थानी प्रवेश केला, सगळ्यांचं लक्ष त्यानं वेधुन घेतलं, सर्वांगावर घातलेल्या सुवर्णालंकारानी त्याच्या भोवतालचा काही भाग स्वप्रकाशित झाल्यासारखा दिसत होता, एखाद्या पुरुषाच्या अंगावर एवढं सोनं मी प्रथमच पाहात होते, आमच्या नाट्यशाळेतले नट देखिल एवढे दागिने घालत नसत. तो धनुष्याजवळच असलेल्या एका रिकाम्या आसनावर बसला, आणि मोठ्या अभिमानानं त्यानं त्याचं खड्ग दोन्ही पायांच्या मध्ये टेकवलं, त्याच्या मुठीवर उजवा हात ठेवुन डाव्या हातानं त्यानं त्याच्या मानेवरचे केस मागे फिरवले ते त्याच्या बलदंड बाहुंचं प्रदर्शन करण्यासाठीच. अजुन एक दोन राजांनी धनुष्याला प्रत्य्ंचा लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर त्याचा मंत्री उभा राहिला, त्यानं काकांना नमस्कार केला आणि सर्व सभेला उद्देह्शुन म्हणाला ' या सुदिनी सुमुहुर्तावर मी सुवर्णलंकाधिपती रावणाचा मंत्री या नात्यानं या स्वयंवरात त्यांच्या भाग घेण्याची इच्छा महाराज जनकांसमोर सादर करतो आहे, त्यांची अनुज्ञा द्यावी.'
काकांनी प्रथम जानकीकडं पाहिलं ती गोंधळलेली आहे, हे दिसतच होते, मी लगेच बंधनेनं दिलेल्या निलवस्त्रानं तिच्या मानेवरचा घाम पुसला, क्षणार्धात ते वस्त्र लाल झालं. मी दंडावरच्या बाहुबंदामध्ये दडवलेल्या कुपी काढण्यासाठी हात वर केला खरं पण तो हात तिथंच धरला गेला, मी चमकुन मागं पाहिलं, बाबा उभे होते. मी हात खाली केला अन तिच्या दुस-या बाजुला जाउन शांत उभी राहिले, जे होईल ते पाह्त. काही क्षण असेच तंणावात गेले, जानकीनं एकदा रावणाकडं अन एकदा काकांकडं पाहिलं, यावेळी मात्र तिचे डोळे चमकल्याचं जाणवलं मला, दोन क्षणांत काकांचा हात वर झाला. राजा रावण, उठला, खांद्यावरचं वस्त्र आसनावर ठेवुन त्यावर आपलं खड्ग ठेवलं, अन दोन पावलं टाकत त्या धनुष्यापर्यंत पोहोचला देखील. एका गुड्घ्यावर खाली बसत त्यानं त्याला नमस्कार केला, अन वर उठतानाच एका झट्क्यानंच ते धनुष्य उचललं, त्याबरोबरच, आतापर्यंत सा-यांनाच गोंधळात टाकणारी त्याची प्रत्यंचा देखील सर्र्कन हवेत फिरली. ती वर हवेतच झेलत त्यानं धनुष्याच्या एका टोकाला ती बांधली, दुसरं टोक धनुष्याच्या टोकावर बांधणार इतक्यात त्याच्या वरच्या टोकाच्या दोन करड्या रंगाच्या रत्नांपैकी एक निघुन त्याच्या डोळ्यावर पड्लं, रावणाचं लक्ष विचलित झालं अन ताणलेली प्रत्यंचा त्याच्या हातुन गळुन पडली, अन धनुष्य खाली जमिनीवर पड्लं.
निशब्द शांततेमध्ये जानकीनं सोडलेला निश्वास बाकी कुणाला नसेल पण मलातरी नक्कीच ऐकु आला. मी पुन्हा तिचा हात हातात घेतला, मगाशीचा कंप नाहीसा झालेला होता. यानंतर फारच कमी लोक उरले होते,