Sunday, June 19, 2016

अंकोदुहि भाग् ०७

त्याचवेळी, काही ऋषीचं तिथं आगमन झालं, आणि त्यांच्या बरोबर दोन युवक होते, ते होते ऋषीवेशातच मात्र त्यांच्या हातात शस्त्रं होती, त्यांच्या पायातल्या लाकडी खडावांच्या खडखडाटानं सभास्थान भरुन गेलं, जेंव्हा ते सर्वजण मध्यभागी थांबले तेंव्हा अपयशानं दुखी दिसणारा रावण आपले अलंकार,वस्त्रं अन खड्ग सावरीत निघाला होता, आतादेखील तो तेवढाच तो-यात चालत होता जेवढा आत येताना होता. तो बाहेर गेल्यावर तिथली कुजबुज कमी झाली, ' हे जनकाधिपती प्रजावत्सल जनका, माझ्या बरोबर अयोध्यानरेश दशरथाचे पुत्र राम व लक्ष्मण आलेले आहेत, आणि ते देखिल इथं उपस्थित असलेल्या राजांच्या एवढेच या स्वयंवरात भाग घेण्यासाठी योग्य आहेत परंतु काही काळापासुन ते आम्हां बरोबर असल्याने ते इथं उपस्थित असलेल्या इतरांसारखे राजवस्त्रांलंकारांनी सज्ज होउन येउ शकले नाहीत, आणि अशी माझी खात्री आहे की ह्या स्वयंवरात सर्व लायक क्षत्रियांना भाग घेता येईल, या साठी त्यांना तुझी अनुमती असावी असं मला वाटतं ' त्या ऋषींचं हे बोलणं संपलं त्याच वेळी शस्त्रधारी ते दोन युवक पुढं आले, खांद्यावरची तपकिरी रंगाची भिल्ल प्रकारची धनुष्यं सावरत त्यांनी काका आणि बाबांकडे पाहात नमस्कार केला.
बाबा, घाईघाईनं आसनावरुन उठुन खाली गेले, त्यांनी त्या ऋषींच्या पायावर मस्तक ठेवुन नमस्कार केला अन अतिशय आदरानं त्यांना आसनावर बसवलं, बाजुच्याच आसनांवर राम आणि लक्ष्मण देखील बसले. दोन्ही राजकुमारांनी सगळ्या सभेचं लक्ष वेधुन घेतलं, ऋषींनी ओळख करुन दिली नसती तरी ते दोघं एखादया मोठ्या वंशाचे आहेत हे त्यांच्या चेह-यावर आणि हालचालीतुन समजत होतंच. बाबा, पुन्हा व्यासपीठावर आल्यावर त्यांचं, काकांचं अन कुलगुरुंच काही बोलणं झालं, अगदी हलक्या आवाजात. काही क्षणांनंतर काकांनी आसनावरुनच हात वर करुन आज्ञा दिली, त्याच वेळी सगळ्या मंडपातुन पसरुन राहिलेलं आमचं सैन्यदल बाहेरच्या बाजुला निघुन गेलं, माझा हात नकळत कंबरपट्ट्यामधल्या शस्त्रावर स्थिर झाला, आता अगदी एकदाच लक्ष देउन पाहिलं तरी मोजता येतील आणि लक्षात राहतील एवढेच लोक मंडपात उरलेले होते. काकांनी ऋषींच्या दिशेनं बघुन हातानंच अनुज्ञा दिली, राम आसनावरुन उठले, खांद्यावरुन धनुष्य आणि त्याखालचं भिल्ल वस्त्र काढुन ठेवलं, सभेच्या मध्यभागी येउन व्यासपीठाकडं पाहात काकांना नमस्कार केला, वळुन धनुष्याकडं गेले त्याला नमस्कार केला, आणि जणु काही बराच काळ ते धनुष्य हाताळत असल्याप्रमाणं, ते उचललं, एका बाजुला प्रत्यंचा लावली, ते टोक डाव्या पायात पकडलं, प्रत्यंचेचं दुसरं टोक उजव्या हातात होतं, डाव्या हातानं धनुष्य पकडलेलं होतं. आमच्याकडं त्यांची पाठ होती, दोन क्षण थांबुन उजवा हात पाठीमागुन फिरवत धनुष्याच्या टोकापर्यंत नेला, आणि प्रत्यंचा धनुष्याला बांधली. पण पुर्ण झाला, आणि व्यासपीठाकडं वळत उत्सुकतेनं प्रत्यंचेला ताण दिला, ताणलेली प्रत्यंचा सोडताच झालेला नाद सगळ्यांनीच आश्चर्यचकित करुन गेला.
झाल्ं, स्वय्ंवराची अट् पुर्ण् झाली, रामान्ं ते धनूष्य् खाली ठेवल्ं आणि पुन्हा मागं वळुन् काकांना नमस्कार् केला आणि जाउन् आसनावर् बसुन् राहिला, ताईची अवस्था मात्र पाहावत् नव्हती. तिच्या चेह-यावर् आश्चर्य् आणि मोह् एकत्रच् दिसत् होते, जणु काही ती याच् क्षणाची वाट् पाहात् होती, पण् त्याचवेळी तो येउ नये असंही तिला वाटत् होत्ं.
बाबांनी पुढ्ं होउन् स्वय्ंवराचा सोहळा स्ंपल्याची घोषणा केली, तसेच् सर्व उपस्थित् राजांचे आणि इतर जनांचे आभार् मानले, पाहता पाहता त्या ऋषीगण् आणि राम् लक्ष्मणाच्या बाजुला आमच्या सैनिकांची एक् तुकडी अर्धवर्तुळाकार् परिघात् उभी राहिली, बाबा खाली उतरुन् त्यांच्याकडे जाउन् त्यांच्याबरोबर् बोलत् होते, काकांनी आम्हां सर्वांना तिथुन् वाड्यात् जायला सांगितल्ं. आम्ही चौघीजणी शांतपणे आत् आलो, एव्हाना तिथ्ं जे काही झाल्ं ते आई आणि काकुना कळाल्ं होत्ंच्.. त्यांच्याही चेह-यावर् आन्ंद् होता. ताईला समोर् बघताच् काकुन्ं जवळ् घेतल्ं, दोघींच्या डोळ्यातुन् अश्रु वाहात् होते.
त्याच दिवशी एक राजदुत अयोध्येला पाठवण्यात आला, राम, लक्ष्मण आणि ऋषींची राहण्याची व्यवस्था वाड्याच्या जवळच असलेल्या एका उद्यानात केली होती. सगळे नगरवासी आता, स्वयंवराची तयारी आवरुन विवाहाच्या तयारीला लागले होते, तीन चार दिवसांनी राजा दशरथ आपल्या कुटुंबियांसहित मिथिलेला येत असल्याची वार्ता आमच्या गुप्तचरांतर्फे आम्हाला मिळाली.

0 comments:

Post a Comment