Wednesday, August 31, 2011


श्रावणाच्या पहिल्या रविवारी भुलेश्वर ते शेवटच्या रविवारी पाटेश्वर असा शाक्तपंथीय शिवालयांचा प्रवास घडला, भुलेश्वराचे फोटो आधीच टाकलेत म्हणुन हे पाटेश्वराचे.
जवळुन पाहिल्यावर हे फुलांचे ताटवे दिसले,
हि दोन फुलं तर घ्यावीच वाटली
अजुन किती लांब अन उंच असा विचार करतानाच अचानक समोर काही बांधीव पाय-या आल्या बहुधा आपल्याला इथंच जायचंय जवळच, आता सामानाचं ओझं जरा हलकं वाटायला लागलं, पाय-या संपता संपताच समोर आली ती त्या बाजुच्या डोम्गरातच खोदुन काढलेली गणपतीची प्रतिमा अगदी रिद्धी सिद्धि सहित.
मुर्तीच्या पायावर डोकं ठेवलं पण पायवाट पुढं पुढं जातच होती.
आता बराच वेळ चालल्यावर पुन्हा एक बांधकाम असावं असं काही दिसु लागलं, वाटेतच एक मोठं झाड, वडाचं का पिंपळाचं, समजुन घ्याय्ला वर नजर फिरवली तर छे विश्वासच बसेना त्याचा, चाफ्याचं झाड एवढं मोठं, पण विचार करायला वेळ नव्हता, सहज मागं पाहिलं,
कळकबेट
किती छान कुंड आहे, आणि चक्क कमळं आहेत त्यात,
थांबुन चालणार नव्हतं,
त्या दगडी पाय-या पार करुन पुढं आलो आणि थबकले, देवळाच्या बाहेर देव आणि तो ही असा
पुढं नेणा-या या पाय-या अन त्यांच्या भिंतीतले हे दिव्यांचे कोनाडे,
एका मोठ्या कोनाड्यातलं हे शिवलिंग
ही अजुन एक सुरक्षादेवता
पाय-यांचा वर असलेलं हे देउळ
आणि हा नंदि
आणि त्याच्या पायाला वेटो़ळा घातलेला हा सर्प,
आणि त्या नंदिच्या पायात असलेलं हे शिवपुजेचं शिल्प
देवळाच्या बाहेरच्या भिंतीत असलेला हा महामहादेव,
पुर्वी अतिशय रागीट पण आता या मर्त्य मानवाला काही करत नाहीये,
याच देवळाच्या प्रांगणातली अजुन काही मंदिरं जी पाहुन सगळ्यांनाच आश्चर्य वाटेल ,
का हेच पहा, हा शेषशायी विष्णु अगदी लक्ष्मी सह चक्क महादेवाच्या देवळात
आणि हा चार मुखी ब्रम्हा चक्क शस्त्रासह
आणि महादेवाच्या सर्पांबरोबर जन्मोजन्मिचं वैर असणारा विष्णु वाहन गरुड पण,.
खरंतर देउळ हे याचं महादेवाचं
ही चार हात असलेली शिव प्रतिमा
बाहेरची ही अष्टभुजा
आणि हा स्त्रि गणेश
ही शिव पार्वती प्रतिमा
आणि ही इतर मंदिरं, सगळी शिवाचीच पण भव्य अन गुहेत कोरुन काढलेली.
इथं पिंडीवर पिंडी आहेत, वेगळाच प्रकार
पिंडिवरच काय पण गुहेतल्या खांबावर अन भिंतीवर पण पिंडीच आहेत. आणि बाकी आहेत त्या पिंडी तरी किती वेगळ्या आहेत..
ह्या पिंडी आहेत का उखळं आहेत ?
हा दुसरा नंदी आणि त्याच्या पाठीवरची वेग़ळीच नक्षी.
हे नंदिच्या वर असलेले छत
हे मंदिराचे गवाक्ष, दगड कोरुन काढलेले ,
जेवढ्या या पिंडी अनाकलनिय तेवढ्याच या खुणा सुद्धा.
अरे भगवंता शंभो हे काय रे हा प्रकार तुलाच माहिति याची महती अन कार्यकारणभाव
]
काही धार्मिक अथवा ऐतिहासिक माहिती चुकीची असण्याची शक्यता आहे तरी त्या त्या क्षेत्रातल्या तज्ञांनी मार्गदर्शन केल्यास बदल करेन.

Print Page

Saturday, August 20, 2011

’असे ही तसे हि’ आणि दुसरं ’ अग्निसखा’.


हल्ली असे क्षण फार कमी येतात आपल्या आयुष्यात की जे पुन्हा पुन्हा जगावे वाटतात, म्हणजे मागच्या पिढितल्यांना त्यांचे सगळं आयुष्य पुन्हा जगावसं वाटत असेल असं नाही, पण म्हणुनच हा लेखनप्रपंच तायडीच्या म्हणजे क्रांतीच्या जीवनातल्या अनेकोत्तम सुखी क्षणांपैकी काही क्षण पुन्हा जगवण्यासाठी.(अशी जड जड वाक्यं सुरुवातीला टाकली म्हणजे आता उशिर झाल्याबद्दल शिव्या नको खायला).

मा. सुरेश भटांच्या आशिर्वाद अगदी सुरुवातीच्या काळात लाभले क्रांतीला आणि जसं काही नदीनं उगमानंतर लगेचच समोरच्या कड्यावरुन झोकुन द्यावं तसं तिनं कविता आणि गझलांच्या विश्वात स्वताला झोकुन दिलं, घरची मोठी लायब्ररी, बाबांचं आपल्या लेकरांना वाचनाचं वेड लावण्याचं वेड, या आणि अशा ब-याच गोष्टींनी या काव्यसरितेला वेग दिला,योग्य वेळी मिळालेलं प्रोत्साहन आणि कौतुकाच्या झ-यांनी ह्या नदीचा विस्तार वाढवला नसेल कदाचित पण त्या पाण्याला वाहतं ठेवलं, त्याला त्याचा मुलभुत गुणधर्म, वाहणं विसरु दिला नाही.
पुढं ही नदी,डोंगर द-यांतुन पठारावर आली तसं वाहण्याच्या गुणधर्माबरोबर कर्तव्याच्या तीरांचा एक नाजुक बंध तिला मिळाला,त्या बंधात स्वताला सुखानं बांधुन घेत आणि त्याच्या सुरक्षित मर्यादांच्या कठिण पणानं अजुन सुखावत ती पुढं वाहत राहिली, आज पर्यंत त्या नदिच्या एका एका वेगळ्या वेगळ्य़ा वळणानं, छोट्या छोट्या खळाळांनं आपल्या सर्वांना मोहित केलं, क्षणभर आपली दुखं, कष्ट विसरायला लावले, आज अशाच काही वळणांचा, आंतरप्रवाहांचा अन त्या डोहातल्या भोव-यांचा एक एकत्रित अनुभव आपल्यासाठी, या रसिकांसाठी सादर केला जातो आहे.
नदीला स्व:ताचं नाव असलं तरी तिच्या प्रवाहातल्या या मोहमयी डोहांना पण वेगळी नावं आहेत, एक आहे
’असे ही तसे हि’ आणि दुसरं ’ अग्निसखा’.
श्री. परांनी इथं माहिती दिलेली होतीच, त्यानुसार क्रांतीच्या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा सात ऑगस्ट, रविवारी नागपुर येथं साजरा केला, त्याचा हा रिपोर्ट.
या दोन पुस्तकांबद्दल थोडं साहित्यिक लिहुन झाल्यावर थोडी तांत्रिक माहिती, हा सोहळा साजरा केला नागपुरच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभाग्रुहात, रविवारी संध्याकाळी.
वर फोटोत दिसतंय त्याप्रमाणे प्रमुख पाहुणे व इतर मान्यवर यांचे आगमन झाल्यावर, क्रांतीची ज्येष्ठ कन्या अश्विनिनं कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं, सुरुवात मा. श्री. गिरिश गांधी यांच्या अतिशय मोजक्या शब्दातल्या अन थेट भाषणानं झाली.
श्री. गिरिश गांधी.
यानंतर दिप प्रजव्लन, सरस्वति पुजन झालं, आणि नंतर मुख्य सोहळा झाला प्रकाशनाचा,
व्यासपिठावरच्या मान्यवरांनी त्या सोनेरी फिती सोडुन चमकणा-या कागदात बांधलेल्या दोन पुस्तकांना त्यांचा पहिला मोकळा श्वास घेउ दिला अन त्या पुस्तकांएवढंच छान अन मोठं हसु क्रांतीच्या चेह-यावर फुलुन आलं,
या कविता, गझला या तिला तिच्या लेकरासारख्याच, पण लेकराला जन्म देताना एक विशिष्ट कालावधि असतो तो माहित असतो, पण हे कविता गझलांचं तसं नसते, त्या आधी मनात, मेंदुत जन्मतात, मग कागदावर उतरतात आणि कालांतरानं पुस्तकरुपात येतात, कविला किंवा कवयित्रिला हे जन्मचक्र तीन वेळा भोगावं लागतं, भोग म्हणुन तो सुखाचा असतो अन वेदनेचाही, पण त्या सर्व प्रवासात हा एक थांबा, एक विसावा फार महत्वाचा असतो.
यानंतर, प्रमुख पाहुणे मा. गझलनवाज श्री, भिमराव पांचाळ उर्फ दादांनी, मराठी गझलांचं विश्व आणि त्यातल्या स्त्री गझलकारांविषयी सुंदर विवेचन केलं, आधीच मराठित गझल हा तसा थोडासा दुर्लक्षित काव्य प्रकार अन त्यात पुन्हा स्त्री गझलकार हे तर दुर्मिळात दुर्मिळ या परिस्थितीवर त्यांनी जे भाष्य केलं त्याचा त्यांना निश्चितच अधिकार आहे. त्यांच्या बोलण्यातुन त्यांच्या या अधिकाराबद्दल समोरच्याला करुन दिली जाणारी नम्र जाणिवसुद्धा जाणवत होती पण गर्व नव्हता, राजानं तो राजा आहे हे समोरच्याला जाणवुन दिलंच पाहिजे पण त्याच्या राजेपणाचा समोरच्याला बोजडपणा न वाटता असं दादांचं भाषण झालं, त्यांनी क्रांतीला शुभेच्छा आणि आशिर्वाद तर दिलेच पण त्याचबरोबर ’ आता थांबशील तर बघ’ असा सज्जड दम पण दिला. या गझलांपैकी काहि गझला ते त्यांच्या गझलगायनाच्या कार्यक्रमात घेणार असल्याचंही त्यांनी सुचित केलं.
कोणतंही लेखन हे फक्त आपल्या मित्र आप्तांनी डोक्यावर घेउन नाचलं म्हणजे चांगलं असं होत नाही, त्या मधलं बरं वाईट निवडायला एक टिकाकार, एक समिक्षक असावा लागतो, ति भुमिका या ठिकाणी डॉ. सुलभा हेर्लेकरांनी पार पाडली, क्रांतीच्या कविता, गझला छान आहेत यात वाद नाहीच परंतु त्या पुस्तकरुपात आणण्यास तिनं जो उशिर लावला याबद्दल सुलभाताईंनी तिचे थोडे कान पिळले.
यानंतर, स्वत: क्रांतिनं दोन शब्द बोलले, खरंतर जिनं तिच्या कवितेतुन एवढं काही बोललं आहे, तिच्याकडुन त्या कविता ऐकण्याचीच अपेक्षा होती अन ती सुद्धा पुर्ण केली तिनं.
सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभ झाल्यानंतर अश्विनी व प्रतिक(क्रांतीचा भाचा), यांनी माईकचा ताबा श्री.फड्णीसांच्या कडे आभार प्रदर्शनासाठी दिला,
कार्यक्रम संपत आल्याची जाणिव आणि पुन्हा एकदा आपल्या व्यवहारी जगात जाण्याची लगबग सर्वांच्या चेह-यावर दिसत होती, सर्व उपस्थित रसिक अल्पोपहाराचा अन चहाचा आस्वाद घेत होते, त्याचवेळी, फडणीसांनी दादांच्या म्हणजे भिमराव पांचाळांच्या ’ गरिबाच्या लग्नाला नवरी’ या प्रसिद्ध गझलेबद्दल त्यांना छेडलं आणि त्यांच्या विनंतीला मान देउन दादांनी या प्रसिद्ध गझलेचे दोन कडवी गाउन दाखवली, अन ख-या अर्थानं या सुंदर कार्यक्रमाची अतिशय सुंदर सांगता होणार याची खात्री झाली.
कार्यक्रमाचा प्रत्यक्ष शेवट प्रथमेशनं गायलेल्या वंदे मातरम या राष्ट्रगीतानं झाली.
या नंतर हॉटेल प्रेसिडेंट इथं झालेल्या कौटुंबिक प्रितिभोजनाच्या समारंभाला अनपेक्षितरीत्या दादांची उपस्थिती सर्वांनाच छानसा धक्का देउन गेली, त्याच वेळी काही इतर प्रख्यात नेट कविंचा प्रत्यक्ष भेटण्याचा योग जुळुन आला.