Monday, June 27, 2016

अंकोदुही भाग १०

‘ तुम्हांला दोहींना महाराजांनी बोलावलं आहे,’ दासीच्या आवाजानं दोघीही एकदमच भानावर आलो, अंगावरची वस्त्रं सावरुन लगेच काकांच्या कक्षाकडं निघालो, जाताना मांडवी अन् श्रुतकिर्ती देखील आमच्या बरोबरच होत्या .
काकांच्या दालनात न नेता आम्हाला राजसभेच्या मोठ्या दालनात बोलावलं होतं, याचा अर्थ आता जे बोलणं होणार आहे ते वैयक्तिक किंवा कौटुंबिक नव्हतं तर त्यापेक्षा जास्त मोठे असं काही होतं. आम्ही सगळ्याजणी जेंव्हा तिथ्ं पोहोचलो, तेंव्हा तिथ्ं आई, बाबा, काका, काकु आणि काही म्ंत्रि व आमचे कुलगुरु बसलेले होते. आमच्या साठी आसनं राखुन ठेवलेली होतीच, आम्ही बसताक्षणीच, काकांनी बोलायला सुरुवात केली,‘हे कुलगुरु आणि मंत्रिगण,सितेचं स्वयंवर संपन्न झालं, अयोध्येचा राजकुमार रामाबरोबर तिचा विवाह निश्चित झाला आहे, त्याचवेळी राजा दशरथांनी एक प्रस्ताव ठेवला आहे, तो प्रस्ताव या तिघींच्या संदर्भात आहे’
शेवट करताना काका आमच्या आसनांजवळ् आले होते.. त्यांनी मंत्रिगणांपैकी एक, स्वधत्वांना पुढे बोलायला सांगितले, त्यांनी राजा दशरथांचा प्रस्ताव आम्हां समोर मांडला, आणि पुन्हा आसनस्थ् झाले..
‘ विवाह हा एक अतिशय वैयक्तिक् निर्णय आहे प्रत्येक् स्त्री साठी, त्या बद्दलच्या प्रस्तावाची चर्चा अशी राजमंत्र्यांचा समोर का करण्यात येते आहे, याचं कारण विचारु शकतो का आम्ही ? मी माझा प्रश्न विचारला. आईचं माझ्याकडं पाहणं मला अजुनही आठवतं, किंचितसा धाक आणि बरंच कौतुक होतं तिच्या बघण्यात..
काका आता माझ्या आसनाच्या मागंच आले होते, तेंव्हा स्वधत्वांना काही बोलायचं होतं, पण काकांनी हात वर करुन त्यांना बसायला सांगितलं, ‘उर्मिले, हा प्रश्न मला फक्त तुझ्याकडुनच अपेक्षित होता अन तु माझा अपेक्षाभंग केला नाहीस. होय, विवाह संबंध हा वैयक्तिकच निर्णय आहे तुमच्यासाठी, नव्हे सर्वांसाठीच पण राजा दशरथ आणि त्यांच्या मंत्र्यांनी जी शंका उपस्थित केलेली आहे, त्या शंकेचं उत्तर शोधण्यासाठी किंवा तिचं निराकरण करण्यासाठी त्यांनीच हा प्रस्ताव् मांडला आहे, आणि हे इतक्या कमी वेळात झालं आहे, याचा अर्थ या प्रस्तावावर त्यांनी इथं येण्यापुर्वीच विचार केलेला आहे. सहज सुचलेला असा हा उपाय नाही. या प्रस्तावावर आपण जो काही निर्णय देउ त्याचे बरेच साद पडसाद फक्त सितेच्या किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यावरच पडतील असे नाही तर आपल्या राज्यावर, राजकारणावर देखील पडु शकतात्.’
‘ ते काय असतील याबाबत आज दिवसभर मी आणि तुझ्या बाबांनी आपल्या मंत्रिसभेसोबत आणि सेनाध्यक्षांसोबत् विचार केलेला आहे, तसेच दिवसभर तुझी काकु आणि आई ह्या कुलगुरंसोबत याबद्दलच्या शास्त्र आणि धर्मग्रंथाच्या संदर्भाने चर्चा करत होत्या. या दोन्ही बाजुंनी विचार केल्यास हे चारही विवाह होणं हे आपल्या राज्याच्या सुरक्षेच्या आणि भविष्यातील प्रगतीच्या दुर्ष्टीनं उपयुक्त आहेच, आणि शास्त्रांनी देखील अशा विवाहांना मान्यता नाकारलेली नाही.’
 ‘ आता प्रश्न उरला तुमच्या आयुष्याच्या जोडिदाराची निवड तुम्ही करण्याबाबत, .. आईनं उठुन आमच्या बाजुला येत बोलायला सुरुवात केली. ‘ अयोध्येच राज्य आणि  तिथला राजवंश हे काही उत्क्रुष्ट राजसंस्थांपैकी एक आहेत, राजा दशरथांचे चारही पुत्र शारिरीक, बौद्धिक आणि भावनिक कसोट्यांवर उत्तम उतरु शकतील याबाबत आपल्या गुप्तहेरांनी खात्री दिलेली आहे, आणि आपल्या आयुष्यभराच्या सहचराबद्दल अशा उत्तम क्षत्रिय कुळात जन्मलेल्या पराक्रमी पुरुषांपेक्षा तुमची अपेक्षा फार वेगळी नसेल असं आम्हांला वाटतं’

आणि हे सुद्धा लक्षात घ्या, जर हा प्रस्ताव आमच्या पैकी एकालाही योग्य वाटला नसता, तर या चर्चेसाठी तुम्हाला बोलावण्यात आलंच नसतं, तुमचं मत विचारलं गेलंच नसतं. आता हा प्रस्ताव स्विकारणं किंवा नाकारणं हेचं तुमचं स्वयंवर आहे असं तुम्ही समजु शकता..

Sunday, June 19, 2016

अंकोदुहि भाग् ०९

आज, वाड्यातला मोठा चौक सजवला होता, सर्व् बाजुंनी तलम् वस्त्रांचे पडदे अन् त्या जोडीला विविध आकाराची आसनं, वेगवेगळ्या पुष्परचना आणि खुप सारे सुगंधी द्रव्यांचे धुप त्या चौकात एका मंगल कार्याची चाहुल देत होते. तिस-या प्रहराला दशरथ राजा सहित, राम्, लक्ष्मण्, ऋषीगण, कुलगुरु आणि मंत्रिगणांचं आगमन झालं, बाबा स्वागताकरिता वाड्याच्या मुख्या प्रवेशद्वाराजवळच उभे होते. चौकात सगळे जण् आल्यावर, काकांनी सर्वांचं स्वागत केलं, ज्याला त्याला मानानुसार आसनांवर बसवलं गेलं, मध्याभागी दोन वर्तुळाकार आसनांवर् काका आणि राजा दशरथ बसले होते. जलपान् आणि मिष्टान्न सेवनानंतर बराच काळ चर्चा होत राहिली.
‘’ जनका, तुम्ही तुमच्या कन्येचं उभं केलेलं स्वयंवर माझ्या मुलानं जिंकले आहे, हे तुमचं आणि आमचं, सौभाग्यचं म्हणावं लागेल, या दोन्ही प्रचंड आणि बलवान राज्यांमध्ये जुळुन येणारा हा संबंध आपल्या सुरक्षित भविष्याची सुरुवात ठरेल हे नक्की. परंतु माझ्या एका मंत्र्यानं एक शंका उपस्थित केलेली आहे, त्याबद्दल आपण आपापल्या कुलगुरुंचा विचार घ्यावा असं मला वाटतं..
राजा दशरथांच्या शांत अन गंभीर आवाजानं तिथं उपस्थित असलेले सगळेजण मोहित झाले होते जणु,, ‘’ तुझी कन्या सीता हि तुमची निजकन्या नाही, तुम्हाला सापडलेली या भुमिच्या पोटात, तिचं उत्पतस्थान आणि वंश यांचा शोध लागणं फार कठिण आहे. अशा कन्येबरोबर् माझ्या ज्येष्ठ् राजपुत्राचा विवाह झाला, तर तो क्षत्रिय आणि अक्षत्रिय विवाह् ठरेल आणि वर्णभेद झाल्यानं आणि यानंतर माझ्या इतर तीन पुत्रांचा विवाह क्षत्रियकन्यांशी होणं ही गोष्ट अवघड होईल.
‘ परंतु महाराज दशरथांनी असा विचार करावा हे योग्य वाटत नाही ‘ काकांचा आवाज् सुद्धा तेवढाच शांत आणि विश्वासु होता. ‘ प्रत्यक्ष देवाधिदेवांच्या प्रसादानं आपणांस प्राप्त झालेले हे चार् पुत्र तेवढेच पराक्रमी अन् तेजस्वी आहेत., हा वर्णभेदाचा विचार एखाद्या अशक्त क्षत्रियानं केला पाहिजे, आपल्यासारख्या बलवान राजा आणि अयोध्येसारख्या शास्त्रनियंत्रक राजसत्तेसाठी असा विचार योग्य नव्हे.
‘योग्य आणि मान्य असा विचार तुम्ही पुढं ठेवला आहे राजा जनक, जसे आम्ही चार पुत्रांचे पिता आहोत तसेच तुमच्या शुभकुळात् देखील् अजुन तीन कन्या आहेत. या स्वयंवराने राम जानकीचा विवाह् सिद्ध झाला आहे, तसेच लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचा विवाह् त्या तिघिंच्या समवेत करुन हा शास्त्रोत्त्पन्न प्रश्न सोडवता येउ शकतो..’
एखाद्या गोष्टीचा फार खोलवर आणि दुरपर्यंत विचार करुन बोलल्याप्रमाणे राजा दशरथांनी त्यांचा विचार त्या छोट्याश्या सभेपुढे ठेवला. या शक्यतेचा कुणी विचारच केला नसावा, किंबहुना ताईचं स्वयंवर, ते धनुष्य या गोष्टी एवढ्या मोठ्या झालेल्या होत्या की त्यामागे असा काही विचार करावा हे देखील कुणाला सुचले नाही. अर्थात बाबा आणि आईच्या बोलण्यात ब-याच वेळा अशा प्रकारच्या चर्चा ऐकु येत हे खर्ं..
त्या दिवशी इतर काही विषय नव्हताच कुणाला बोलायला, नगरातल्या नागरिकांपासुन ते आमच्या मंत्रीगणांपर्यंत हा एकच विषय होता, ताईच्या वेगळेपणाचा प्रभाव एवढ्या प्रखरतेनं या पुर्वी कधीच जाणवलेला नव्हता. या सगळ्यांनं तिला एकाकी वाटु नये म्हणुन् मी तिच्या दालनात् गेले. ती नेहमी प्रमाणे शांत होती, मंचकावर झोपुन ती फार काही गहन विचार करत आहे असं जाणवलं मला, तरी देखील माझ्या चाहुलीनं ती उठली अन पश्चिमेच्या तिच्या आवडत्या गवाक्षात् जाउन् उभी राहिली, मी तिच्या जवळ जाउन थांबले, बाहेर सुर्य क्षितिजाला टेकला होता, कोणत्याही श्रेष्ठ रंगकर्मीन्ं कितीही तपस्या केली तरी शक्य होउ नये अशा रंगछटा तिथं पसरल्या होत्या, आणि दर क्षणाला त्यांच्यात असंख्य बदल होत होते, काहीशा वेगानं चाललेल्या वा-यांनी चुकार ढगांबरोबर खेळ चालवलेला होता.
तितक्यात सुर्यास्ताचा घंटानाद नगरात दुमदुमु लागला, आमच्या मागुन आलेल्या एका दासीनं घाईनंच त्या गवाक्षावरचा जाड गवताचा पडदा खाली पाडला अन् आम्ही दोघी पुन्हा कालच्याच पुष्करणिजवळ येउन बसलो, काहीही न बोलता, बरंच काही सांगितलं जात होतं अन् ऐकु येत होत्ं.. शेवटी ताईनंच सुरुवात केली.. ‘ का गं, तुम्हा क्षत्रियकन्यांना मान्य आहे का असा विना स्वयंवराचा विवाह,? स्वत्ः निवड करण्याचा तुमचा अधिकार तुम्हाला आहे, पण तो न वापरता येणं याला तुमची तयारी आहे?
‘स्वयंवराची गरजच आहे कशासाठी, तर एखाद्या स्त्रीला ज्या पुरुषाबरोबर आपल्ं आयुष्य व्यतित करायचं आहे, तिला तो पुरुष योग्य वाटतो किंवा नाही, हे समजुन् घेण्याचा हा अधिकार् आहे. यांत स्वातंत्र्य निवडीचं आहे, ‘ मी आईबरोबरच्या चर्चेतुन जे मला समजलं होतं त्याचा विचार करुन उत्तर दिलं..
परंतु, ही निवड करायची आहे, ती कोणत्या क्षमतांवर, त्या पुरुषाची युद्धसज्जता, परहत्या पराक्रम का संपत्ती का बौद्धिक संपन्नता अथवा प्रजननक्षमता.. माझ्यासाठी हा धनुष्याचा पण उभा केला गेला, पण जर हे धनुष्यच नसतं तर कशाच्या आधारावर मला माझ्या आयुष्याच्या जोडिदाराची निवड करावी लागली असती ? ताईच्या मनात असे बरेच प्रश्न होते तसे माझ्या मनात् देखील. त्यांची उत्तरं माझ्याकडंही नव्हती त्यामुळं मी शांत राहायचं ठरवलं. अशा वेळी शांतताच आपल्या प्रश्नांची उत्तरं देते किंवा कधी कधी त्या प्रश्नांचं अस्तित्वच मिटवुन टाकते.
मग असे प्रश्न पडुन राहतात शस्त्रागारांच्या अंधा-या कोप-यात पडुन राहिलेल्या वज्रांच्या पात्यांसारखे, त्यांच्या तुटलेल्या धारेला आता काहीही अर्थ उरलेला नसतो, आणि त्या मोडुन् पडलेल्या शराग्रांसारखे ज्यांच्या मागचे काष्ठांगही तुटुन गेल्यानं ते होउन राहिलेले असतात धातुंचे तुकडे, पुन्हा कधी एकदा तो अग्नी वितळवुन् टाकेल अन पुन्हा जन्म होईल या आशेवर.
आणि हो एकदा का हे अर्थहीन वाटणारे धातुंचे तुकडे वितळवले की मग मात्र त्यापासुन् पुन्हा बनतात तशीच शस्त्रे जी पुन्हा तेवढीच जीवघेणी असतात, तुम्हाला हवी असली तरी किंवा कसेही..

अंकोदुहि भाग् ०८



पुर्वी एका रात्री मी आईच्या मांडीवर डोकं ठेवुन झोपण्याचा प्रयत्न करत होते, तेंव्हा आईनं विचारलं, ' बाळा, काहीतरी विचारायचं आहे तुला, आणि त्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय मला सुद्धा शांतता मिळणार नाही, विचार काय हवंय तुला ?'
मी आईला आज पुन्हा तोच प्रश्न् केला, ‘’ आई, स्वयंवर् म्हणजे आपल्याला जो आवडेल्, हवासा वाटेल् असा वर् निवडण्याच्ं स्वात्ंत्र्य् देणारी व्यवस्था ना, मग् ताईच्या स्वय्ंवरात् तो धनुष्याचा पण् कशासाठी ठेवला गेला ?, त्या धनुष्याच्ं अन् ताईच्ं काही नात्ं आहे. आणि तु मागे एकदा क्षत्रिय असा उल्लेख् केला होतास्, त्याचा इथ्ं काही स्ंब्ंध् आहे अशी श्ंका आहे मला, या सगळ्याचा उलगडा झाल्याशिवाय् मला देखिल् शांतता लाभणार् नाही.’’
आईच्या चेह-यावरचे शांत भाव् बदलत चालल्याच्ं मला जाणवल्ं, अगदी तिच्याकड्ं न पाहता देखील्, माझ्या डोक्यावर् फिरणारा तिचा हात् आता एकाच् ठिकाणी स्तब्ध् झाला होता. ‘’ हे पहा बाळा, तु म्हणतेस् ते अगदी योग्य् आहे, एखाद्या स्त्रिला तिला योग्य वाटेल् अशा पुरुषाशी विवाह् करण्याची मोकळीक् असण्ं म्हणजे स्वयंवर्, पर्ंतु हे तुम्हां तिघींच्या, क्षत्रियकन्यांच्या बाबतीत् खर्ं आहे, कारण् तुमचा जन्मच् झालेला असतो, स्वत्ंत्र विचाराच्या आणि निर्णयक्षमता असलेल्या स्त्रि पुरुषाच्या संकरातुन्, तुमच्या आईन्ं देखील् स्वयंवराचा अधिकार् वापरुन् आपल्या पतिची निवड् केलेली असते, पर्ंतु तुझ्या ताईच्ं तस्ं नाही, ती भुमिकन्या, जमिनिच्या पोटात् एका पेटित सापडलेली, तिच्या ख-या मातापित्यांविषयी कुणालाच सत्य् माहित् नाही.
मग या भुमिलाच तिची आई मानल्ं जाउ लागल्ं, क्षत्रिय् हे या भुमिवर् राज्य करणारे आणि भुमि हे राज्य् करुन् घेणारी हा नियम् आहे या जगाचा. या भुमिच्ं रक्षण् करण्ं हे आपणा क्षत्रियांच्ं कर्तव्य, या बदल्यात् हि भुमी त्यांना धान्य्, धातु अशी स्ंपत्ति देत् राहते.. तिला आपला रक्षक् निवडण्याच्ं स्वात्ंत्र्य् नाही, अनेक् वेळा युद्धातुन् किंवा तहांमधुन् तिचा रक्षक् , तिचा अधिकारी बदलतो,
म्हणुन् तुझ्या ताईसाठी हा स्वयंवरात् हा पण् ठेवला गेला, निदान् या धनुष्याच्या निमित्तान्ं तरी या भुमिकन्येचा विवाह् योग्य अशा क्षत्रियाबरोबर् व्हावा जो तिच्ं रक्षण् करु शकेल्, तिला जपु शकेल् आणि तिच्यापासुन् प्राप्त् होणा-या स्ंपत्तीचा अधिकारी होउ शकेल्.
या उत्तरान्ं ना माझ्ं समाधान् झालं, ना आईच्ं पण् आता अजुन् झोप् टाळण्ं शक्य् नव्हत्ं, म्हणुन् आम्ही दोघीही झोपी गेलो.
या दिवसान्ंतर् आमच्या नगरांत् फिरण्यावर् ब्ंधन्ं आली, कुठेही जायच्ं असेल् तर् बाबांना किंवा काकांना विचारुनच् जाव्ं लागे आणि प्रत्येकवेळी महिष् दलाच्या आवरणातच् वावराव्ं लागे, नाट्यशाळा असो की गोशाळा, एखादाच् दिवस् उद्यानात् आणि नदी किनारी जायची परवानगी मिळे.
‘ उद्या राजा दशरथ् आणि त्यांचे म्ंत्रिगण् वाड्यात् येणार् आहेत्’ बाबांनी आमच्या दालनात् येत् घोषणाच् केली, आम्ही तिघी उठुन त्यांना नमस्कार् केला, उद्या तिस-या प्रहरी राजा दशरथ् आणि त्यांचे सहकारी म्ंत्रि तसेच् कुलगुरु येणार् असल्याच्ं कळाल्ं, बाबा, काका आणि इतर् मोठ्यांना तर काही वेळ् नव्हता, त्यांच्या सोबत् सगळी मिथिला नगरी एक् लग्ननगरी झाली होती.. सगळे जण् विवाह समारंभाच्या तयारीत् लागले होते, पण् अजुन् विवाह् कधी आहे हेच् ठरलेल्ं नव्हत्ं, उद्याच्या भेटीच्या वेळी या सर्व् गोष्टी ठरतील् अस्ं आईन्ं सांगितल्ं.
ती रात्र मी आणि ताईन्ं वाड्यातल्या पुष्करिणिच्या काठावर् बसुन् बोलत् जागवली.. ‘’ ताई, तुला पुन्हा भेटावं अस्ं वाटलं का गं रामाला, ? मी विचारल्ं ‘ नाही ग, त्या दिवशी आपण् नाट्यशाळेत् जात् होतो तेंव्हा त्यांच्या निवासाजवळुन् रथ् जाताना दिसले होते, थांबाव्ं अस्ं वाट्लं देखील्, पण् बाबांची आज्ञा आठवली अन् काही बोलले नाही.’’
‘हो, पण् तेंव्हा तर् ते दिसले होते ना, च्ंपकव्रुक्षाखाली बसलेले त्या ऋषींसोबत्, एका हातात् खड्ग् होत्ं अन् दुस-या हातात् बाण्, तुझा विचार् होता तर थांबलो असतो, मी तर बाबांची अनुमती घेतली असती अशा वेळी..
अजाणतेपणी मी तिला तिच्ं वेगळ्ंपण् जाणवुन् देण्याचा प्रयत्न् केला, अन् ती एकदम् शांत झाली, समोरच्या पाण्यात् पाहात्. मग मीच् माझ्या डोक्यातुन् एक् फुल् काढुन् पाण्यात् टाकल्ं अन् पाणि हलल्ं तस्ं तिच्ं एकटक् पाहण्ं भंगल्ं, ‘’ खर्ं सांगु, आता या पाण्यात् पण् मला रामाच्ंच् चित्र दिसत्ंय्,’’ तिच्या चेह-यावर् पुन्हा तेच आश्चर्य् आणि मोहाचे तर्ंग् उमटत होते.